संगमनेरची दहशती संस्कृती जनता सहन करणार नाही: डॉ.सुजय विखे

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे आयोजित सभेनंतर थेट माझ्यावरच हल्ला करण्याचा कट रचला गेला होता, असा दावा करत थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सभेत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला केल्याचे दृश्य संपूर्ण राज्याने पाहिले, असे वक्तव्य डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. विखे पाटील यांनी आरोप केला की, थोरात समर्थकांनी महिला कार्यकर्त्यांना लक्ष्य केले आणि त्यांच्या वाहनांवर नियोजनबद्धरित्या तोडफोड व जाळपोळ केली.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर आणि राहाता तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, दहशत निर्माण करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. जर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर, रविवारी संगमनेरात निषेध मोर्चा काढण्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला. सभेत त्यांनी वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरही कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पोलिसांनी त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी भूमिका मांडली.

घटनेनंतर विखे पाटील यांनी दिलेला संदेश स्पष्ट होता – तालुक्यात वाढत्या लोकप्रियतेमुळे अस्वस्थ झालेल्या काही घटकांनी त्यांच्या सभेत हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यांना या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून ते त्वरित कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणाहून बाहेर पडले. मात्र, थोरात समर्थकांनी नियोजित पद्धतीने महिला व कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर दहशत निर्माण केली. गाड्या जाळण्यासाठी साहित्य तयार होते हे दर्शवते की, हल्ला पूर्वनियोजित होता. विखे पाटील यांनी या सर्व गोष्टींना ठरवून केलेले षडयंत्र ठरवलेले असू शकते, असा आरोप केला आणि सांगितले की, संगमनेरच्या नागरिकांना हे सहन होणार नाही.

जाहिरातीसाठी 9325024536

या घटनेबाबत तालुक्यातील नागरिकांत संतापाची भावना होती. लोणी बुद्रूक येथील ग्रामस्थांनी रस्ता रोको करून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. शालिनीताई विखे पाटील यांनीही घटनेचा निषेध केला आणि वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ल्याचा कट हा निंदनीय आहे आणि आपली संस्कृती भिन्न आहे. आमच्या नेत्यांनी चांगल्या संस्कारांत वाढले आहेत, आणि अशा कृतींचा आपला कडक विरोध आहे."

घटनेबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करूनही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी देशमुख यांचे वक्तव्य हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आणि हल्लेखोरांवर तातडीने कारवाईची मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form